Posts

Showing posts with the label आदिवासी

देश अमृत महोत्सवात व्यस्त, मेळघाट पाणीटंचाईने त्रस्त

Image
तब्बल दोनशेहून आधिक गावानध्ये तीव्र पाणीटंचाई अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वत रागांमध्ये वसलेला प्रदेश आहे. सर्विकडे डोंगराळ हिरवेगार, जैवविविधतेने नटून थटून, आदिवासी बहुल समाज जीवन व आदिवासी संस्कृती असलेला, तो एक भाग आहे. सोबतच विदर्भातील नंदनवन म्हणून प्रख्यात असलेले चिखलदरा हे पर्यटन स्थळ ही इथेच आहे. ह्या मेळघाट मागे एक वास्तव लपलेलं आहे. ते म्हणजे भीषण पाणीटंचाईचे. विविधतेने नटलेल्या या प्रदेशातील तब्बल दोनशेहून अधिक गावे ही तीव्र पाणीटंचाईने ग्रस्त आहेत. येथील नागरिकांना कोसोदूर डोंगर दऱ्यातुन चढाव उतार करून पायपीट करत तसेच दूरवरच्या गावातून मिळेल त्या साधनाने पाणी आणावे लागते. शासना कडून टँकरने पाणी पुरवठा केला जातो. मात्र तो ही तोंडाला पाने पुसल्या सारखाच. गावातील नागरिकांना दिवसरात्र एकच चिंता असते ती म्हणजे मुबलक व शुद्ध पिण्याजोगे पाणी कुठे मिळणार? टँकरने मिळणारे पाणी, लोकांचे आपसात भांडण होऊ नये म्हणून, विहरीत सोडले जाते. तो ही गढूळ असल्याने रोगराईला आमंत्रणच. कावीळ, हगवण, ताप, अंगदुखी, पोटदुखी इत्यादी रोगांचा सामना येथील नागरिक करत असतात....

मेळघाटात घडत आहेत एकलव्य

Image
एकलव्य फाउंडेशनच्या मदतीने     मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वत रागांमध्ये वसलेला, सर्विकडे डोंगराळ हिरवेगार, जैवविविधतेने नटून थटून, आदिवासी बहुल समाज जीवन व आदिवासी संस्कृती असलेला, अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा तालुका म्हणजेच मेळघाट. हा भाग बालमृत्यू, कुपोषणसाठी तर प्रसिद्ध आहेच सोबतच शैक्षणिक कुपोषण ही तितकाच आहे? असे म्हणता येईल. येथे मोठ्या प्रमाणात कोरकू व इतर आदिवासी समाज आहे. हा समाज अतिशय दुर्गम व जंगल भागात राहत असून या समाजातील आजही युवक युवती शिक्षणापासून वंचित आहेत. याकरिता एकलव्य फाउंडेशन गेल्या ४ वर्षांपासून येथील विद्यार्थ्यांना १२वी पुढील उच्च शिक्षण काय? व यातील नोकरीच्या संधी संबंधाने वेगवेगळे उपक्रम राबवत असते. एकही पदवीधर विद्यार्थी भेटायचा नाही, म्हणून एकलव्य पुढे आले.. १० वर्षा आधी याभागात काम करत असताना एकलव्यचे संस्थापक राजू केंद्रे यांना इथे एकही पदवीधर विद्यार्थी भेटायचा नाही. एवढ्या चांगल्या क्षमता असणाऱ्या भागात एकही पदवीधर मुलगा नाही. प्राथमिक व उच्च शिक्षणात खूप मोठी दरी आहे. ती दरी भरून काढण्यासाठी, लोकल लिडरशीप उभी राहिली पाहिजे या मत...

मेळघाट येथे शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळा

Image
एकलव्य फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम कल्याणी राठोड/ राम वाडीभष्मे: मेळघाट येथील कोरकू व इतर आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना १२वी पुढील उच्च शिक्षण काय? व यातील नोकरीच्या संधी संबंधाने चिलाटी येथे तीन दिवसीय शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळेचे निवासी आयोजन एकलव्य फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले.  या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना कृषी, पर्यावरण, वन व्यवस्थापन, पत्रकारिता व त्यातील संधी, शिक्षणाद्वारे सामाजिक परिवर्तन, सामाजिक शिक्षणातील शिक्षणाच्या संधी तसेच पुणे येथील शैक्षणिक संस्था व वसतिगृह, मेळघाट येथून एकलव्यच्या माध्यमातून बाहेर शिक्षणाकरिता गेलेल्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.  या कार्यशाळेत चिलाटी हातरु भागातील १२वीचे ८० विद्यार्थी उपस्थित होते. चिलाटी हे ठिकाणी चिखलदरा तालुक्यातील मध्यप्रदेश सीमेलगत आहे. येथे मोठ्या प्रमाणात कोरकू समाज आहे. आपल्या क्षेत्राचा तसेच कुटुंबाचा विकास करावा हे उद्दिष्ट ठेवून, एकलव्य फाउंडेशन मेळघाट भागात गेल्या ४ वर्षांपासून पहिल्या पिढीतील विद्यार्थी पुढे उच्च शिक्षणासाठी देशातील नामांकित विद्यापीठात पाठवण्य...

राणीगावाला पाणीटंचाईची चिंता

Image
जानेवारी पासूनच पाणीटंचाईला होतो सुरुवात   कल्याणी राठोड / राम वाडीभष्मे : पश्चिम मेळघाटातील धारणी येथून ३५ किमीच्या अंतरावर असलेले राणीगाव येथे जानेवारी महिन्याच्या शेवटीपासून पाणीटंचाईला सुरुवात होते. तर उन्हाळ्यात येथील गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण होत असते. या गावी दोन विहीर असून विहिरीला कसे म्हणून पाणी राहत नाही. इथे नागपूर, अमरावती व पुणे येथील भूवैज्ञानिक बोलावून पाणी पातळीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सुद्धा निषफल निघाला. ७ वर्षाआधी ११ किमी अंतरावरील गोलाई या गावातून पाणी व्यवस्था करण्यात आली होती. आता ३ ते ४ किमी अंतरावरील कंजोली या गावारून पाईपलाईच्या माध्यमातून पाणी आणून येथील विहिरीत सोडले जाते. गावाची लोकसंख्या जवळपास २१०० आहे.  या गावातील नागरिक मिळेल तेव्हा पाणी भरत असतात. दिवसरात्र येथील नागरिक विहिरीच्या फेऱ्या मारत असतात. इथे दोन ठिकाणी बोरवेल खोदल्या गेल्या पण त्या सुद्धा कोरड्याच निघाल्यात. गावात नळयोजना तर आहे पण पाण्याची सोय नसल्याने ती सुद्धा बंद पडून आहे. भूजल पातळी वाढावी म्हणून गावानजीक तलाव तयार करण्यात आले. परंतु त्याचा सुद्धा काहीही ...

मेळघाटातील चालता बोलता विक्कीपीडिया म्हणजे मैत्रितील राम फड सर..

Image
लाल टीशर्ट घातलेले राम फड सर राम फड  हे १९९८ मध्ये मेळघाट भागात सामाजिक कामाच्या आवडीने आले. आज त्यांना याभागात २४वर्षे झाली असून ते  मैत्री या संस्थेत  कॉर्डिनेटर यापदावर कार्यरत आहेत. मेळघाटातील हातरु या भागातील गावांचे काम मैत्रीच्या माध्यमातून सांभाळतात.  मैत्री ही संस्था मेळघाटातील अतिशय दुर्गम असा हातरु भागात काम करत आहे. सध्या या संस्थेचे काम हातरु भागातील १५ गावात नियमितपणे तर १० गावांमध्ये अधूनमधून काम करत आहे. ही संस्था या भागात प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण व रोजगार, आधुनिक शेती तर गरजे नुसार निर्माण होत असलेल्या मुद्द्यांवर काम करते आहे.  राम सर यांचा या भागातील अभ्यास हा सामाजिक, आर्थिक, राजकीय, आरोग्य व भौगोलिक यात असून याभागातील त्यांना प्रत्येक गावातील परिस्थिती गल्यांगल्या त्यांना माहिती आहे. सोबतच त्यांचा भूगर्भाचा अभ्यास अगदी बारीक असून पाणी टंचाई संबंधाने सुद्धा त्यांनी काम केलं व करत आहेत.  सोबतच त्यांच्याकडे याभागातील १९९८ पासून आता पर्यंत झालेल्या प्रत्येक बालमृत्यूचे पंचनामे त्यामागील कारणे नोंदी सहित असून याभागातील बालमृत्यू कमी होण...

आदिवासी महिलांमध्ये नेतृत्व गुण विकसित करणार ; शुभदा देशमुख

Image
जागतिक महिला दिनानिमित्ताने विशेष मुलाखत अवंती भोयर / राम वाडीभष्मे फोटो शुभदा देशमुख यांच्या एफबीवरुन सादर   गडचिरोली जिल्हा अतिशय दुर्गम व मागासलेला असून येथील मोठ्या प्रमाणात असलेला आदिवासी समाज हा सामान्य समाज जीवनाप्रमाणेच विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न डॉ. सतीश गोगुलवार व शुभदा देशमुख हे ध्येयवादी दाम्पत्य गेल्या ३५ वर्षांपासून करत आहेत. रोजगारापासून ते आरोग्यापर्यंतच्या आदिवासींच्या सर्वच प्रश्नांना हे दाम्पत्य भिडत असून कुरखेडा (जि. गडचिरोली) येथे मुख्यालय असलेल्या ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी`ही संस्था १९८४ मध्ये स्थापन करून तेव्हापासून शेती, आरोग्य, अपंग आणि ग्रामविकासाच्या उपक्रमांमध्ये सहभाग घेत आहे. आदिवासींच्या सक्षमीकरणाचा वसा संस्थेच्या माध्यमातून त्यांनी घेतला आहे.   महाविद्यालयीन काळात इतर विद्यार्थ्यांप्रमाणे सतीश आणि शुभदा हे सुध्दा जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाने भारावून गेले होते. जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखालील आंदोलनात तरुणाई मोठय़ा संख्येने सहभागी झाली. मात्र, आंदोलन विघटित होत गेले आणि त्यात सहभागी झालेल्यांनी नव्या दिशा शोधण्यास सुरुवात केल...